Wednesday, 28 December 2016

“स्मारक”



       पडताच वार्ता कानावरती...तो रायगड पुन्हा का रडला होता.
सागरी स्मारक उभे राहते...पण गड बुरुज तो खचला होता.

       पाहताच तो ताशिव कातळ...शिव मनात हर्षे रुचला होता.
इथेच तख्त हिंदवी स्वराज्य...का स्वये शिवप्रभू वदला होता.

       उभे कराया हिंदवी सिंहासन...मावळा रक्ताने भिजला होता.
पाहण्या राज्याभिषेक शिवाचा...गड राजधानी तो नटला होता.

       स्मारक तेची मनात अमुच्या...जिथे प्राण शिवाचा थांबला होता.
शिव समाधीचा अमुल्य ठेवा...छातीशी त्याने जपला होता.

       समुद्री पोटी शिव स्मारकाचा... पाया नवा हा रचला होता.
गड बुरुजांवर प्रेमी युगुलांचा...स्वप्न महाल तो सजला होता.

       कुठे दारू मटणाच्या पार्ट्या...गड बाटल्या पिशव्यांनी माखला होता.
पडके बुरुज ढासळती तटबंदी...ढीग दगड झुडूपाचा उरला होता.

       सागरमार्गे ओळखून धोका...शिव बलाढ्य आरमार निर्मित होता.
भुई अश्वाच्या टापेखाली...समुद्र मुठीत धरला होता.

       नौदल आमुचे निष्प्रभ ठरले...शासनदरबारी फिकीर न चिंता
सागर वेढा तोकडा तो पडता... का २६/११ घडला होता.

       गगनभेदी ते स्मारक उभरते...उत्साह मनामध्ये भरला होता.
शत्रू शिरतो समुद्र मार्गे...आदर्श शिवप्रभूचा हरला होता

        कित्येक कोटीचे खर्च स्मारका...इथे तलवार तुकडा चोरीला होता.
जगश्रेष्ठ स्मारक उभे पण... इथे शिवचरणांचा धुरळा होता

        डोंगर दऱ्याचा तुफान वारा...खुल्या दर्याला भिडला होता.
सह्याद्रीचा वाघ आज का...पुतळ्या मध्ये अडकला होता.

       उद्या कदाचित नव स्मारकाच्या... सहल भेटीचा येयील भरता.
शिव भक्तांना स्पुर्ती देण्या... हा सहवास गडाचा राहो पुरता.

        पुजत राहू मनात रायगड...इथे अखेर शिवप्रभू निजला होता.
शिवसमाधीचा हरएक पत्थर...शिव पराक्रमाची गातो गाथा.



...
...
      मन्या ठाकूर


No comments:

Post a Comment